

Rohit Sharma in Hotel : टीम इंडियाचा कर्णधार ‘हिटमॅन’ रोहित शर्मा हा देशातील सर्वाधिक पसंतीचा क्रिकेटपटू आहे. हिटमॅनची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात. यंदा १५ ऑगस्टलाही असाच प्रकार घडला. खरंतर रोहित त्याच्या मित्राला भेटण्यासाठी मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये गेला होता. हे लक्षात येताच रोहितचे हजारो चाहते रेस्टॉरंटबाहेर जमा झाले. प्रत्येकजण आपल्या स्टार क्रिकेटरची एक झलक पाहण्यासाठी आतुर दिसत होता. या चाहत्यांना आवरणं कठीण झालं होतं.
काय झालं?
दरम्यान, रोहित रेस्टॉरंटमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता, पण, प्रचंड गर्दी पाहून त्याला आपला विचार बदलावा लागला आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला परत आत पाठवलं. रोहितचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांची एवढी गर्दी पाहून रोहितही अस्वस्थ झाला. त्यानं कपाळावरच हात मारला.
हेही वाचा – स्वातंत्र्यदिनी मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला ३ तासात ठार मारण्याची धमकी कुणी दिली?
Rohit's kgf🥵@ImRo45 #RohitSharma𓃵pic.twitter.com/AqGnqp4X05
— YAHYA V45 (@V45Yahya) August 16, 2022
Indian Captain Rohit Sharma Spotted 💙!!
Fans are waiting outside the hotel to see Rohit Sharma ❤️ pic.twitter.com/jANxsUco55— ROHIT TV™ (@rohittv_45) August 16, 2022
अलीकडेच, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, भारतीय क्रिकेट टीमनं वेस्ट इंडिजचा पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत पराभव केला. त्यानंतर टीममधील काही वरिष्ठ खेळाडूंना ब्रेक देण्यात आला आहे. आशिया चषकापूर्वी रोहितही ब्रेकवर आहे. मात्र, हा ब्रेक त्याच्यासाठी त्रासदायक ठरला. मुंबईतील ‘द टेबल’ रेस्टॉरंटमध्ये तो आपल्या मित्राला भेटायला गेला होता. काही वेळातच या रेस्टॉरंटबाहेर त्याच्या चाहत्यांची मोठी गर्दी जमली. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. ३५ वर्षीय रोहित नेतृत्व कौशल्याच्या बाबतीत हुशार आहे. पूर्णवेळ कर्णधार झाल्यापासून त्यानं एकही टी-२० मालिका गमावलेली नाही.
टीम इंडियाची फिटनेस टेस्ट
रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ तीन वनडे मालिकेसाठी झिम्बाब्वेला पोहोचला आहे. १८ ऑगस्टपासून दोन्ही देशांदरम्यान तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. आशिया चषकासाठी रवाना होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे फिटनेस शिबिर बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये होणार आहे. येथे खेळाडूंना फिटनेस चाचणी द्यावी लागेल. यानंतर टीम इंडिया दुबईला रवाना होणार आहे. जिथे टीम इंडियाचा २-३ दिवसांचा कॅम्प असेल. आशिया चषकात भारताला २८ ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे.
हेही वाचा – ‘दादा’गिरीला पुन्हा सुरुवात..! सौरव गांगुली क्रिकेटच्या मैदानात; करणार भारतीय संघाचं नेतृत्व!
भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध
२७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान यूएईमध्ये होणाऱ्या आशिया कपमध्ये सहा संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी श्रीलंका, भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान याआधीच पात्र ठरले आहेत. त्याचबरोबर सहावा संघ पात्रता स्पर्धेद्वारे निश्चित केला जाईल.