घातपात की अपघात? सांगलीत आईसह तीन मुलींचा मृत्यू; तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या आणि…

WhatsApp Group

Sangli News : सांगली जिल्ह्यातील बिळुर गावात एक दुदैवी घटना घडली आहे. या गावातील तलावात बुडून आई आणि तीन मुलींचा मृत्यू झाला आहे. ही घटना कशी घडली ते अद्याप समजू शकलेली नाही. मात्र, तलावाच्या बाजूला काही कपडे आणि कपडे धुण्याचा साबण मिळाला आहे. तलावातून चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सुनीता माळी (वय ३०), अमृता माळी (वय १३), अश्विनी माळी (वय १०), ऐश्वर्या माळी (वय ७) अशी मयत झालेल्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता माळी या आपल्या मुलींसह कपडे धुण्यासाठी तलावावर गेल्या होत्या. मात्र, त्या घरी परतल्याच नाहीत. या चौघींचेही मृतदेह रविवारी रात्री तलावाच्या पाण्यात आढळून आले. यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या चौघींचाही मृत्यू कशामुळे झाला, हा अपघात आहे की घातपात याचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा – 5G सिममुळे बँक अकाऊंटमधून पैसे गायब..! अनेकांची फसवणूक; करू नका ‘ही’ चूक!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment