एका घरात आढळले 4 मृतदेह! महाराष्ट्रात ‘बुरारी’ घटना, संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त!

WhatsApp Group

Maharashtra : दिल्लीच्या बुरारी घटनेची आठवण करून देणारा एक भयानक प्रकार महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात समोर आला आहे. धुळे शहरात गुरुवारी एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये एक जोडपे आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे. संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने प्रत्येकजण हैराण आणि अस्वस्थ आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आज तकने या प्रकरणाची माहिती देताना धुळे पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार या दाम्पत्याने मुलांना विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास धुळ्यातील देवपूर भागातील प्रमोद नगरमध्ये ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली.

हेही वाचा – जगात वाढतोय ‘हा’ आजार, 2050 पर्यंत होणार 4 कोटी लोकांचा मृत्यू!

एका व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घरात प्रवेश केला असता त्या व्यक्तीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मात्र त्यांची पत्नी आणि दोन मुलेही घरात बेशुद्धावस्थेत आढळून आली.

पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, घरातील हे दृश्य पाहिल्यानंतर पोलिसांच्या पथकाने कुटुंबातील चारही सदस्यांना तात्काळ रुग्णालयात पाठवले, जेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. संपूर्ण कुटुंबाच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकलेले नाही, असे संबंधित पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणातील सत्य बाहेर काढण्यासाठी तपास करण्यात येत आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment