Agriculture : मोदी सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना एक भेट दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांशी संबंधित 7 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली, ज्याचा फायदा देशभरातील शेतकऱ्यांना होणार आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय कृषी क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदी सरकारने शेतकऱ्यांशी संबंधित 7 योजनांना मंजुरी दिल्याची माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्वनी वैष्णव म्हणाले की, देशातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मंत्रिमंडळाने 7 मोठे निर्णय घेतले. आहेत.
हेही वाचा – रशियाची गुप्तहेर व्हेल Hvaldimir नॉर्वेमध्ये सापडली मृतावस्थेत!
शेतकऱ्यांसाठी….
- केंद्रीय मंत्रिमंडळाने अन्न, पोषण या पीक विज्ञानासाठी 3,979 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी.
- केंद्रीय मंत्रिमंडळाने फलोत्पादन विकासासाठी 860 कोटी रुपये आणि कृषी विज्ञान केंद्रांसाठी 1,202 कोटी रुपये देण्यास मंजुरी .
- शाश्वत पशुधन आरोग्यासाठी सरकारने 1,702 कोटी रुपयांची योजना मंजूर.
- कृषी शिक्षण आणि व्यवस्थापन बळकट करण्यासाठी 2,292 कोटी रुपयांची तरतूद असलेला कार्यक्रम मंजूर.
- अन्न, पोषण या पीक विज्ञानासाठी समर्पित 3,979 कोटी रुपयांची योजना मंजूर.
- केंद्रीय मंत्रिमंडळाने 2,817 कोटी रुपयांच्या डिजिटल कृषी मिशनला मंजुरी.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!