माणसाच्या मृत्यूनंतर आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्टचं काय होतं?

WhatsApp Group

आधार हे देशातील व्यक्तीची ओळख आणि पत्त्याचे सर्वात वैध दस्तऐवज बनले आहे. यासोबतच बँकिंग व्यवहार, एलपीजी सबसिडी, पीपीएफ खाते आणि सरकारी शिष्यवृत्ती यासारख्या योजनांचा लाभ घेण्यासाठी हे आवश्यक कागदपत्र आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, अशी कोणतीही प्रणाली नाही की एखाद्याच्या मृत्यूनंतर आधार आपोआप निष्क्रिय होईल. परंतु UIDAI आणि भारताचे रजिस्ट्रार जनरल अशा यंत्रणेवर काम करत आहेत, ज्यामध्ये कार्डधारकाच्या मृत्यूनंतर त्याचे आधार निष्क्रिय केले जाऊ शकतात. मृत्यू प्रमाणपत्र मिळताच हे काम पूर्ण होईल. तथापि, ही व्यवस्था होईपर्यंत, नामनिर्देशित व्यक्तीने त्याच्या मृत्यूनंतर बायोमेट्रिक लिंकद्वारे त्याचे आधार लॉक करावे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळता येईल. हे काम UIDAI च्या वेबसाइटवरून केले जाईल.

पॅन कार्ड देखील एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे, जो बँक खाते, डिमॅट खाते आणि ITR (Demat Accounts, ITR Filing) मध्ये वापरला जातो. त्यामुळे, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्याची सर्व खाती बंद होईपर्यंत पॅन सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. आयटीआर भरल्यावर किंवा थकबाकी कर जमा केल्यावर रिटर्न मिळाल्यानंतर पॅन आयकर विभागाकडे सरेंडर केले जावे. हे कायदेशीररित्या आवश्यक आहे आणि तुम्ही आयकर वेबसाइटवरून नियुक्त अधिकाऱ्याचा संपर्क मिळवू शकता. त्याला अर्ज पाठवून पॅन सरेंडर केले जाऊ शकते.

हेही वाचा – IPL 2023 : अखेर कळलं…! धोनी आयपीएल २०२३ नंतर रिटायर होणार?

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे मतदार ओळखपत्र रद्द करणे आवश्यक आहे. मतदारांच्या नोंदणीच्या नियमांनुसार, फॉर्म 7 भरून स्थानिक निवडणूक कार्यालयात मृत्यू प्रमाणपत्रासह सादर करावे लागेल आणि मतदार यादीतून नाव काढून टाकले जाईल.

सध्याचा नियम असा आहे की एखाद्याचा पासपोर्ट कालबाह्य झाला तर तो आपोआप अवैध होतो. मात्र, असे असतानाही ही कागदपत्रे सुरक्षित ठेवा जी भविष्यात उपयोगी पडू शकतात. मृत्यूनंतर संबंधित व्यक्तीचा पासपोर्ट सरेंडर करता येईल, अशी कोणतीही व्यवस्था सध्या नाही. ठराविक कालमर्यादेनंतर ते आपोआप अवैध होते.

डायव्हिंग लायसन्स हे देखील एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे, परंतु अशी कोणतीही व्यवस्था नाही जिथे एखाद्या व्यक्तीचा ड्रायव्हिंग लायसन्स मृत्यूनंतर सरेंडर केला जाऊ शकतो. तथापि, उत्तराधिकार्‍याने स्थानिक आरटीओ कार्यालयाला याची माहिती दिली पाहिजे आणि त्या व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत वाहन देखील त्याच्या नावावर हस्तांतरित केले पाहिजे.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सध्या कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही, जिथे मृत्यूनंतर त्याची कागदपत्रे समर्पण न केल्यास दंड किंवा अन्य कारवाई केली जाऊ शकते. असे असूनही, ही कागदपत्रे निष्क्रिय करण्याबाबतची माहिती संबंधित यंत्रणांना देणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांचा गैरवापर होऊ नये. आज प्रत्येक काम ऑनलाइन केले जाते, त्यामुळे काळजी घेणे अधिक गरजेचे झाले आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment