अग्निपथ योजना : आता फौजी होणं झालं सोप्पं! नवीन निकष जाहीर

WhatsApp Group

Agnipath Scheme In Marathi : भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते. पूर्वी दरवर्षी सैन्यात भरती व्हायची आणि हजारो सैनिक भरती व्हायचे. मात्र, कोरोनाच्या काळात यावर बंदी घालण्यात आली होती. यानंतर गेल्या वर्षी सैन्य भरतीसाठी नवीन अग्निपथ योजना आली. यावरून अनेक वादही झाले. सध्या या योजनेंतर्गत देशातील तिन्ही सैन्यात सैनिकांची भरती केली जात आहे.

या योजनेअंतर्गत सैन्यात भरती होणाऱ्या सैनिकांसाठी काही निकष करण्यात आले होते. हे निकष काहीसे अवघड असल्याचे सांगण्यात आले आहे. आता हे निकष थोडे सोपे केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरला सैन्यात भरती होण्याचे निकष पूर्वीच्या तुलनेत सोपे करण्यात आले आहेत. पूर्वी सामान्य सैनिकांच्या भरतीच्या पात्रतेपेक्षा ते काहीसे कठोर ठेवण्यात आले होते. मात्र, आता हा निकष एकसमान करण्यात आला आहे. यासंदर्भात सैन्याने नवीन धोरण जारी केले आहे.

नवीन धोरण जारी होण्यापूर्वीच अग्निवीरच्या पहिल्या तुकडीने त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून संबंधित युनिटमध्ये रुजू झाले होते. या सर्वांच्या पहिल्या वर्षाच्या पात्रतेचे मूल्यांकन जुन्या धोरणानुसार म्हणजेच कठीण निकषांनुसार करण्यात आले आहे. अग्निवीरचे प्रथम वर्ष प्रशिक्षण केंद्रात आणि नंतर तीन वर्षांसाठी युनिटमध्ये मूल्यांकन केले जाणार आहे. नियमित सैनिकासाठी त्याला 5 हजार फूट उंचीवर 5 किलोमीटरची धाव 25 ते 28 मिनिटांत पूर्ण करावी लागते. तर अग्निवीर 23 मिनिटांत ही शर्यत पूर्ण करून सुपर उत्कृष्ट श्रेणीत येतो. त्याच वेळी, जर नियमित सैनिकांनी 25 किंवा त्यापेक्षा कमी मिनिटांत शर्यत पूर्ण केली तर ते उत्कृष्ट असतील. 23 मिनिटांत शर्यत पूर्ण करण्यासाठी कोणतीही श्रेणी नाही.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment